Ladki Bahin Yojana Apatra Mahila Yadi / KYC Update :
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये सध्या केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेवटचे चार दिवस शिल्लक आहेत उर्वरित महिलांना महिला व बालविकास विभागाकडून विनंती आहे की जवळ लवकरात लवकर ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली नाही त्या महिलांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी अन्यथा पुढील लाभ हा त्या महिलांना मिळणार नाही आणि शेवटची तारीख म्हणजे 30 एप्रिल पर्यंत केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये सध्या केवायसी प्रक्रियेची आणि अर्जाची पडताळणी हे दोन्ही पण कार्य सुरू असताना अनेक हजारो महिला या योजनेमध्ये अपात्र ठरत आहेत तर काही महिला शासकीय महिला कर्मचाऱ्यांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांच्याकडून राज्य सरकार पैसे परत घेणार आहे तर काही महिलांकडून त्यांच्या पेमेंट मधून रक्कम कमी करत आहेत. याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती घेऊया.Ladki Bahin Yojana Apatra Mahila Yadi / KYC Update

या लाडक्या बहिणींकडून वसुली होणार
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये सध्या केवायसी करणे बंधनकारक केलेले आहे त्यामध्ये आता या योजनेमध्ये अनेक गैरप्रकार उघडकीस येत आहेत या अर्जाची पडताळणी आणि ही केवायसी संबंधित पडताळणी मध्ये जवळपास 24000 शासकीय कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आलेले आहे आरटीआय च्या माहितीनुसार किमान 12900 कर्मचाऱ्यांनी दर महिना पंधराशे रुपये चा लाभ घेतल्याचे उघडकीस आले आहे.
याआधी ऑक्टोबर महिन्यामध्ये जवळपास 26 लाख लाभार्थी महिला या योजनेतून अपात्र आढळल्या होत्या त्यात प्रमाणे या वेळेस पण जवळपास 80 हजार महिला आणि 12400 पुरुषा यांचा समावेश या योजनेमध्ये गैरप्रकार केल्याचा आणि चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे त्यामुळे राज्य सरकारला 160 कोटी रुपये चे फटका बसला आहे त्यामुळे हा सर्व लाभ चुकीच्या पद्धतीने घेतलेला जे आपण लाडक्या बहिणीने आणि पुरुषांनी त्यांच्याकडून महिला व बाल विकास विभाग वसुली करणार आहे.

निकषांचा गैरवापर
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये सुरुवातीला काही निकष ठरवले होते त्यामध्ये या योजनेमध्ये लाभार्थी महिलाही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे गरजेचे होते त्यानंतर त्या महिलेचे वय हे 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे आणि ज्या महिला शासकीय कर्मचारी आहेत किंवा ज्यांच्या घरी आयकर दाता व्यक्ती असेल तर त्या महिलेला सुद्धा या योजनेत लाभ मिळणार नाही आणि लाभार्थी महिलाच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असणे आवश्यक होते परंतु या विरुद्ध अनेक सरकारी नोकरी करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज केले आता ते हळूहळू अर्ज पडताळणी प्रक्रियेमध्ये आणि ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना हा सर्व गैरप्रकार उघडकीस येत आहे आणि या लाडक्या बहिणींकडून सरकार वसुली करणार आहे. राज्यातील 13000 लाभार्थी हे अपात्र आढळून आले आहे त्यापैकी साडेसहा हजार महिलांकडून आतापर्यंत 11 कोटी रुपयांची वसुली सुद्धा करण्यात आलेली आहे.

केवायसी साठी फक्त चार दिवस शिल्लक
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये सध्या केवायसी प्रक्रिया जोरावर चालू आहे त्यामध्येच पुन्हा पुन्हा मुदतवाढ देऊन सुद्धा लाडक्या बहिणींची केवायसी प्रक्रिया ही पूर्ण झालेली नाही आता फक्त शेवटचे चार दिवस शिल्लक असून या चार दिवसांमध्ये ज्या महिलांनी केवायसी प्रक्रिया केलेली नाही त्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे किंवा ज्या महिलांची केवायसी प्रक्रियेमध्ये दुरुस्ती असेल त्या महिलांची केवायसी दुरुस्ती करून घ्यावी.
केवायसी प्रक्रियेमध्ये 30 एप्रिल ही शेवटचा दिवस असून ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया या अगोदर होईल त्या महिलांना सुरळीतपणे पुढे पण या योजनेमध्ये लाभ मिळेल आणि ज्या महिलांची केळशी प्रक्रिया झाली नाही किंवा त्यांचे अर्ज बाद झाले त्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येईल म्हणजेच अपात्र होतील.

Ladki Bahin Yojana e KYC Update online apply :
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.