Ladki Bahin Yojana Apatra/Rejected Women List :
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये मागील काही महिन्यापासून सुरू असलेल्या केवायसी प्रक्रियेला अजूनही पूर्णविराम लागला नाही. केवायसी प्रक्रियेसाठी मुदत वाढ परत दिली असून ती 30 एप्रिल 2026 पर्यंत केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लाडक्या बहिणींना संधी आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये आता ज्या महिलांचे केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्या महिलांना हप्ते हे सुरळीतपणे त्यांच्या बँक खात्यात जमा होत असतात परंतु लाखो महिलांचे केवायसी प्रक्रिया अजूनही पूर्ण झाली नाही आहे आणि काही महिलांची केवायसी दुरुस्ती प्रक्रिया बाकी आहे. अशा अनेक महिलांचे समस्या वाढत जात आहेत त्यांना कळत नाही की आपण पात्र आहोत का अपात्र आहोत याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती घेऊया.Ladki Bahin Yojana Apatra/Rejected Women List

केवायसी प्रक्रिया
लाडकी बहिण योजनेमध्ये ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे त्या महिलांना पुढेही सुरळीतपणे हप्ते मिळतील पण ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया अजूनही बाकी आहे त्या महिलांना शेवटची संधी आहे.
योजनेमध्ये 30 एप्रिल नंतर ज्या महिलांचे केवायसी प्रक्रिया झाली नसेल त्या महिलांची यादी ही अपात्र यादीमध्ये नाव दिसेल. मे महिन्यापासून ज्या महिला कोणत्याही कारणास्तव अपात्र झाल्या असतील त्यामध्ये लाडकी बहीण योजनेची सुरवातीचे जे निकष ठरवले होते त्यामध्ये पण अपात्र झाले असतील किंवा केवायसी पूर्ण न केल्यामुळे अपात्र झाले असतील त्या महिलांना मे महिन्यापासून लाभ मिळणार नाही आणि त्या महिला या योजनेतून बाद होतील.

योजनेचा गैरवापर करून लाभ मिळवला
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये सुरुवातीला जे निकष ठरवले होते त्या निकषाच्या आधारे लाखो महिलांनी अर्ज केले परंतु त्यामध्ये अर्जाची पडताळणी प्रक्रिया सुरुवातीला राबवली नाही त्यामुळे लाखो महिलांनी या योजनेचा गैरफायदा पण घेतलेला आहे त्याचे उदाहरण म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील 11 लाख महिला लाभार्थी या योजनेमध्ये होत्या.
सोलापूर जिल्ह्यातील महिला मतदान करणाऱ्या महिलांची संख्या ही जवळपास 18 लाख 19 लाख मतदार संख्या आहे त्यामध्ये 11 लाख महिला ह्या लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी असल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर अर्जाची पडताळणी प्रक्रिया ची आणि योजनेतील निकषाच्या आधारे या योजनेतील गैरफायदा घेणाऱ्या महिलांची संख्या दिसून आली त्यामध्ये सुमारे 3 लाख 40 हजार महिला त्या या योजनेच्या निकषांच्या बाहेर जाऊन लाभ घेत होत्या. त्या सर्व महिला या योजनेतून बात करण्यात आलेले आहेत.

कोणत्या महिला अपात्र होतील
लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांना आतापर्यंत म्हणजेच फेब्रुवारी पर्यंतचे सर्व हप्ते मागील वर्षापासून सुरळीतपणे येत आहेत आणि त्यांची केवायसी प्रक्रिया पण पूर्ण आहे आणि अर्जाची पडताळणी प्रक्रिया पण पूर्ण झालेली आहे अशाच महिलांना पुढील हप्ते मिळतील आणि त्याच महिला या योजनेमध्ये पात्र असतील.
मागील माहितीनुसार जवळपास एक कोटी 75 लाख महिला या योजनेमध्ये सध्या स्थितीमध्ये पात्र आहेत. केवायसी 30 एप्रिल पर्यंत शेवटची मुदत आहे त्यानंतर ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया झाली नाही त्यामुळे या योजनेतून अपात्र होतील आणि केवायसी प्रक्रिये बरोबरच अर्जाची पडताळणी सुद्धा करत आहेत अर्जाची पडताळणी हे सुरुवातीच्या निकषाच्या आधारे महिला व बाल विकास विभाग लाभार्थी महिलांची पडताळणी करत आहेत त्यामध्ये ज्या महिला अपात्र होतील त्या महिलांची यादी ही एक मे नंतर म्हणजेच पुढील महिन्यामध्ये स्पष्ट होईल.

अपात्र महिलांची यादी कशी पहायची
अपात्र महिलांची यादी पाहण्यासाठी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन किंवा लॉगिन करून अर्जदार लॉगिन या पर्यायावर क्लिक करायचे आहे त्यानंतर आपला मोबाईल नंबर आणि कॅपचा कोड टाकून द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला लाभार्थी यादी किंवा अर्जाची शेती असा पर्याय दिसेल त्या ठिकाणी तुमचा अर्ज क्रमांक टाका किंवा आधार नंबर टाका आणि क्लिक करा त्यानंतर तुम्हाला तुमची यादी मिळेल त्यामध्ये आपले नाव चेक करा.
Ladki Bahin Yojana Maharastra Online Apply
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.